• सह्याद्रीचे वादळ : वीर धारेराव

    लेखक: महादु चिंधु कोंडार Read this story in English महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदिवासी, डोंगराळ व दूर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. अशा या अकोले तालुक्यात ज्या वीरांच्या रक्तातून इतिहास धावला, ज्यांच्या मनगटात रग आणि छातीत धग होती असे राघोजी भांगरा, बापू भांगरा, रामा किरवा, धरमा मुंढा, खंडू साबळा, बुधा पेढेकर व धारेराव असवला या आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्याच्या खूप जुन्या इतिहासाची पार्श्वभूमी या तालुक्याला लाभलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात(सन – १८०० ते १८५० च्या दरम्यान) ‘आदिवासी ४० गाव डांगाण’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुळा व प्रवरा नदी खोर्‍यातील भागात ‘राजूर’ ही खूपच जुनी व एकमेव मोठी मानाची बाजारपेठ होती. याच परिसरात डोंगरदर्‍यातील आदिवासी भागात सावकारशाही व इंग्रज राजवटीतील अधिकार्‍यांनी दुही माजवली होती. रानावनांत…

  • मासे पकडण्याच्या साधनांच्या आठवणी

     लेखक – बाळू निवृत्ती भांगरे Read the translated story in English बालपण एक निसर्गानं मानवाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. या वयात अनेक गोष्टीचं कुतूहल, जिज्ञासा असते. मला माझ्या बालवयात मासे पकडण्याच्या साधनांपासून ते मासे पकडण्यापर्यंत अशा अनेक गोष्टीचं कुतूहल वाटायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या गावातील चिंध्या बा (चिंधू बाबा) जवळ मी तासनतास बसून तो तयार करत असलेली विविध मासेमारीची साधने बघत बसायचो. ही साधने कधी आडवी- उभी करून तर कधी त्याची विणकामे मी ओढून पाहत असे. एकदा तर त्यांनी विणायला घेतलेले मासे पकडण्याचे फेक जाळे त्याच्या अनुपस्थित मी गुंतवून टाकले होते. माझ्या या कृत्यामुळे तो माझ्यावर प्रचंड चिडला होता. बांबूची काठी घेऊन मागे लागला होता. मग मी घाबरून माझ्या मित्राच्या घरी जाऊन…

  • मेघपुष्प : जीवसृष्टीचा मूळ आधार

    लेखक: महादु चिंधु कोंडार Read this story in English राम राम मंडळी,पुन्हा एकदा एका नवीन कथेत आपले सहर्ष स्वागत..! या नवीन कथेतील विषय माझ्या वाचक प्रेमींच्या हृदयाचा छेद… मनाचा भेद… आणि भविष्याचा वेध… घेतल्या शिवाय राहणार नाही. सह्याद्रीच्या डोंगर कुशीत वसलेलं पुरूषवाडी हे एक अगदी लहानसं आदिवासी खेडे गाव. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जोडधंदा म्हणून काही लोक पशूपालन करतात. पूर्वीच्या काळी (साधारणत: सन-२०००पूर्वी)  या गावातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर, वेदनामय आणि डोळ्यात पाणी येण्याजोग होता. हिवाळा आणि ऊन्हाळा या दोन मौसमात तर शेती सुद्धा कोरडी ठणठणीत आणि आकाशाकडे एकटक नजर लावून बघायची. ऊन्हाळ्यामध्ये तर या शेतीने हिरवा शालू कधी पांघरलाच नाही. भर पावसाळ्यातही कधी-कधी पावसाने दडी मारली…

  • रान तंबाटे

     लेखक – बाळू निवृत्ती भांगरे Read the translated story in English निसर्गात अनेक वनस्पतींचा खजिना दडलेला आहे.  काही वनस्पती आपल्याला फळे-फुले देतात, काही  वनस्पती कंदमुळे देतात, काही औषधात उपयोगी येतात, काही सुगंध देतात, काही छाया देतात तर काही आनंद देतात. हा रान वानवळा निसर्ग आपल्याला अगदी मोफत देतो. आज आपण अशाच एका रानवानवळ्याची कथा पाहणार आहोत तो रान वानवळा म्हणजे ‘रान तंबाटे’. रान तंबाटे हे जंगली पिकांच्या जंगली वाणांपैकी एक महत्त्वाचे वाण आहे. ज्याला ग्रामीण भाषेत रान तंबाटे म्हणतात. रान तंबाटे म्हणजे बाजारात मिळणाऱ्या टोमॅटोचे छोटे रूप. रान तंबाट्यांचा आकार बाजारात मिळणाऱ्या टोमॅटो पेक्षा बराच छोटा असतो. बाजारातील टोमॅटो कमी पैशात जास्त प्रमाणात आणि सहज मिळतो. रान तंबाटे हे नैसर्गिकरित्या…

  • चमकत्या काजव्यांचं रहस्य

    Story by: Mahadu Chindhu Kondar Read the translated story in English नमस्कार मित्रांनो, माझ्या निसर्ग प्रेमींनो, २० ते २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुरूषवाडी परिसरातील सर्वच ठिकाणी लक्षावधी काजवे दर्शन द्यायचे. जून महिना लागला की, हा ‘काजवा महोत्सव’ अंगणात सुरू व्हायचा. मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी आकाशात काळे ढग जमायचे. त्यावेळी या लहानशा कीटकांचा म्हणजे काजव्यांचा जन्म व्हायचा. काजव्यांच्या या अळीचे अगदी दोन आठवड्यांमध्ये पूर्ण वाढ होऊन सायंकाळी काजव्यांच्या माळा झाडं, झुडपं, डोंगर कपारीच नव्हे तर अंगणात आणि घरात देखील चमकू लागायच्या. तेव्हा या बालपणात कुतूहल जागं व्हायचं की, या छोट्याशा काजव्याला लाईट लागते तरी कशी? आणि याच मौसमात दरवर्षी का दिसतात? इतर महिन्यांत किंवा ऋतूत का दिसत नाहीत? असे अनेक प्रश्न…

  • कथा-ग्रामदेवतेची: यात्रा उत्सव आणि नवरात्रीची

    Story by: Mahadu Chindhu Kondar Read the translated story in English नमस्कार मंडळी, इतिहासाच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की, “History is the guide of man” and ” history is the lamp of experience”! म्हणून मी माझ्या ग्रामदेवतेची कथा आपल्या समोर मांडणार आहे. ही कथा मला माझे आई-वडील व गावातील प्रौढ माणसांनी सांगितली. ही कथा बदलत्या युगानुसार पुढील येणार्‍या पिढ्यांना कळावी, समजावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न…! खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुरूषवाडी गावात जाखुबाई व हनुमान मंदिर ही दोन देवळे अस्तित्वात होती. अज्ञान, अंधश्रध्दा, शिक्षणाचा अभाव पण रूढी-परंपरा व संस्कृती, माणुसकी जपणारी माणसं या गावात नांदत होती. लोक सांगतात की, १५० ते २०० वर्षांपूर्वी  गावात महामारीचे दुखणे आले. (उदा.आजच्या काळातील…